Posts

Showing posts from June, 2021

समंत्रक अभिषेक-पूजन करून, श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा उत्साहात साजरा.

Image
  ।। जय श्रीराम ।। हर हर महादेव... जय भवानी, जय शिवराय...  छत्रपती शिवाजी महाराज की जय...... जय श्रीराम ..... चा अखंड जयघोष...   अशा वातावरणात शिवरायांच्या मूर्तीवर मंत्रोच्चारासह अभिषेक करुन सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत, श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.  विश्व हिंदू परिषद पुणे, श्री शिवज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती (किल्ले सिंहगड) तर्फे तिथीनुसार (ज्येष्ठ शु. त्रयोदशी) हिंदू साम्राज्य दिनी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे चौथे वर्ष असून, प्रतिवर्षी हा सोहळा; किल्ले सिंहगड येथे आयोजित केला जातो. परंतु कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा पुणे शहरात घेण्यात आला.  यावेळी, छत्रपती शिवरायांच्या पायदळाचे सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज मारुती गोळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच, शिवकथाकार समाजरत्न ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांचे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावरील गीत, संगीत आणि वीर रसानेयुक्त असणारे, सुश्राव्य व्याख्यान झाले. ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्या

निसर्ग संवर्धनासाठी सरसावले बजरंगी

Image
।। जय श्रीराम ।।   दि. १३-जून-२०२१ :  निसर्गाचे संवर्धन आणि विशेष करून वृक्षसंवर्धनाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे.  सनातन हिंदू संस्कृती ही नेहमीच निसर्ग पूजन सांगत आली आहे. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन, नारळी पौर्णिमेला समुद्राचे पूजन, कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे पूजन, तर मकर संक्रातीला सूर्याचे पूजन आदी सण निसर्ग पूजनाचाच संदेश देतात.  एवढेच नव्हे तर, " पादस्पर्शे क्षमस्व मे " असे म्हणत प्रातःस्मरणात या धरित्री मातेची क्षमा मागण्याचे संस्कार देखील याच संस्कृतीत केले जातात.  जगतगुरु तुकोबारायांनी तर,वृक्ष वल्ली आम्हा सोयरे असे म्हणत, निसर्गाशी सोयरिकच जोडली आहे.  हीच संस्कृती, परंपरा पुढे चालवण्यासाठी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागाच्या वतीने, स्वामी नारायण मंदिरा मागील (नऱ्हे) टेकडीवर वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन उपक्रम राबवण्यात आला.  याच टेकडीवर गेली तीन वर्षे कार्यरत असणाऱ्या, झाडे लावा झाडे जगवा या संस्थेच्या माध्यमांतून हा उपक्रम घेण्यात आला.  या उपक्रमा अंतर्गत, २०० तुळसीच्या रोपांची लागवड करून वृक्ष संवर्धानासाठी १००० किलो गांडूळखत, संस